मुंबईसह आसपासच्या परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली. या मुसळधार पावसामुळं मुंबईतील रस्ते जलमय झाले असून, पुरस्थिती निर्माण झाली. त्यामुळं रस्ते व रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी चाकरमान्यांनाही मोठ्या त्रासाला सामोरं जाव लागलं. शिवाय, काहींसाठी मुसळधार पाऊस आणि शनिवारची रात्रही काळरात्र ठरली. शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसंच घरांची पडझड अशा ५ दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर मुंबईच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.
शनिवारी मध्यरात्री १ वाजताच्या सुमारास चेंबूर येथील न्यू भारत नगर इथं संरक्षक भिंतीचा भाग ४ ते ५ घरे कोसळून झालेल्या दुर्घटनेतील जखमींना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी १६ रहिवाशांचा मृत्यू झाला. ५ जण जखमी झाले आहेत. १४ मृतांची ओळख पटली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी मदतकार्य केले. दुसऱ्या जवानांनी मदतकार्य हाती घेतले. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडूनदेखील येथे आवश्यक मदत रवाना करण्यात आली. सहा फायर इंजिन, एक रेस्क्यू व्हॅन यांच्यासह २० कामगार रविवारी दिवसभर येथे मदतकार्य करत होते. हे ठिकाण मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित आहे.
To know more, visit: www.mumbailive.com